सामाजिक

संभाजी ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी सचिन जगताप यांची निवड 

शिवतंत्र न्यूज

संभाजी ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी सचिन जगताप यांची निवड 

शिवतंत्र न्यूज 

 

        महाराष्ट्रातील एक आक्रमक संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संभाजी ब्रिगेड च्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी संभाजी ब्रिगेड चे सोलापूर जिल्हा माजी अध्यक्ष सचिन जगताप यांची निवड एकमताने निवड करण्यात आली.

     प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले आहे.  त्यांच्या निवडीनंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला. सचिन जगताप यांची ओळख एक आक्रमक नेतृत्व म्हणून आहे. जिल्ह्याबरोबरच संपूर्ण महाराष्ट्र मध्ये त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. सोलापूर जिल्ह्यातील विविध प्रश्न त्यांच्या नेतृत्वाखाली सोडवले गेले आहेत. लढाऊ कार्यकर्त्यांची मोठी फौज त्यांच्या पाठीशी आहे. मराठा सेवा संघाच्या मुशीतून त्यांची जडणघडण झाली आहे. एक केडर  बेस कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख संपूर्ण राज्यभर असून त्यांच्या निवडीमुळे पश्चिम महाराष्ट्र संभाजी ब्रिगेड मध्ये नव चैतन्य निर्माण झाले आहे.

    या निवडीनंतर बोलताना ते म्हणाले की युगपुरुष पुरुषोत्तम जी खेडेकर साहेब यांचे स्वप्न कारण साकार करण्यासाठी गाव तिथे शाखा आणि घर तिथे कार्यकर्ता हे ब्रीदवाक्य घेऊन संभाजी ब्रिगेडची ताकद पश्चिम महाराष्ट्रात उभी करण्यासाठी मी सर्वंकष प्रयत्न करणार आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये संभाजी ब्रिगेडची ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न राहील. सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ देऊन आगामी काळात पश्चिम महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेड लोकांमध्ये पर्याय म्हणून उभा करण्याचे आपले स्वप्न आहे. मला या ठिकाणी काम करण्याची संधी पक्ष नेतृत्वाने दिली तो निर्णय सार्थ ठरवण्यासाठी मी माझे सर्वस्व पणाला लावेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली. आपण तळागळातील कार्यकर्त्याला संभाजी ब्रिगेडच्या झेंड्याखाली एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार असून आगामी काळात संभाजी ब्रिगेडची ताकद वृद्धिंगत झालेली दिसेल असा विश्वास त्यांनी या वेळी बोलताना व्यक्त केला. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये संभाजी ब्रिगेडची ताकद दाखवून देऊ असेही प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

Tags

मुख्य संपादक : श्री.अतुल वारे पाटील

शिवतंत्र न्यूज.. हे एक असे विचारपीठ आहे जे राष्ट्रमाता जिजाऊ, शिव - शंभू -शाहू -फुले - आंबेडकर विचारधारेशी सलग्न आहे. या थोर महापुरुषांच्या विचारातून प्रेरणा घेऊन एक सशक्त , संवेदनशील समाज घडवणे या भूमिकेतून आपण पुढे जाऊया.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close